Thursday 1 November 2018

श्री क्षेत्र भगवानगड Shri Shetra Bhagawan Gad


*श्री संत भगवानबाबांनी श्री क्षेत्र भगवानगडाची स्थापना कशासाठी केली ?*
धार्मिक संस्कारांच्या अभावामुळे निरपराध मुक्या प्राण्यांची हत्या करुन मांस खाणाऱ्या अडाणी, असंस्कृत, अंधश्रद्धाळू, भोंदूगिरीला बळी पडणाऱ्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या विखुरलेल्या गोर-गरीब, वंचित, दीन-दुबळया समाजाला वारकरी संप्रदायाच्या एकाच छताखाली आणून त्यांच्यामध्ये अध्यात्माबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी बाबांनी परिसरातील भक्तगणांच्या मदतीने भगवानगडाची स्थापना केली.
*भगवानगड हे विशिष्ट राजकीय पक्षाचे व्यासपीठ आहे का ?*
मुळीच नाही.








👇�उतावीळ राजकीय कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा प्रश्न👇
*�मग लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेबांना भगवानगडावर भाषण का करु दिले जात होते ?*
कारण,
साहेबांचा वचक एवढा मोठा होता की जोपर्यंत साहेब स्वतः भगवानगडावर भाषण करत होते तोपर्यंत भगवानगडाला त्रास देण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.
साहेब समाजाचे एकमेव नेते होते. आज ती परिस्थिती राहिलेली नाही.
साहेब नेहमी म्हणायचे की, भगवानगडाचा आदेश माझ्यासाठी सर्वोच्च आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे साहेबांची भगवानगडावर अपार श्रद्धा होती. आज ती परिस्थिती राहिलेली नाही आणि जर कोणाला वाटत असेल की आजही ती परिस्थिती आहे तर
श्री क्षेत्र भगवानगडाचे निष्ठावान भक्त या नात्याने आम्हाला तुमच्याकडून खालील प्रश्नांची उत्तरे हवी आहेत-
*1) साहेबांच्या काळात कोणी भगवानगडाला त्रास दिला का ?*
*2) साहेबांच्या काळात कोणी भगवानगडाच्या महंतांचे पुतळे जाळले का ?*
*3) साहेबांच्या काळात कोणी भगवानगडाच्या महंतांवर गुन्हा दाखल केला होता  का ?*
*4) साहेबांनी भगवानगडाच्या महंतांवर गुन्हा दाखल होऊ दिला असता का ?*
*5) आणि जर साहेबांच्या काळात महंतांवर गुन्हा दाखल झाला असता तर गुन्हा मागे घेण्यासाठी साहेबांनी एवढा कालावधी लागू दिला असता का ?*
*6) भगवानगडाला वरील सर्व प्रकारचा त्रास देणारे लोक इतर समाजाचे आहेत का ?*
*7) ज्या दिवशी गुरुवर्य भगवानबाबांनी भगवानगड स्थापन केला, तेव्हापासून त्यांनी नारायणगडावर स्वतः चा हक्क गाजवला का ?*
*8) भगवानगडाची स्थापना राजकीय गड म्हणून झाली की अध्यात्मिक गड म्हणून ?*
याउलट,
गोपीनाथगडाची निर्मिती ही राजकीय गड म्हणूनच झालेली आहे. समाजाचे *राजकारण* चालविण्यासाठी गोपीनाथगड सक्षम आहे.
तर समाजाला *अध्यात्म* शिकविण्यासाठी भगवानगड सक्षम आहे. हा खरोखर आपला एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांनी *राजकारण* करण्यासाठी भगवानगडावर *अतिक्रमण* करण्याचा प्रयत्न करु नये.(आणि अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तरी गुरुवर्य भगवानबाबा तो प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीत)
आणि हे लक्षात ठेवा की, श्री क्षेत्र भगवानगडाला त्रास देण्याचा प्रयत्न करणारांनो-
*भगवानगडाच्या उभारणीमध्ये तुमचे योगदान काय आहे* ते आधी स्पष्ट करा आणि एक लक्षात ठेवा,
म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात.
*ज्यांनी भगवानगड बांधलाय त्यांचेच वंशज आज भगवानगडाचे रक्षक आहेत हे विसरु नका.*
😡😡😡😡😡😡😡😡









*झालं गेलं घोडं गंगेला न्हालं*
दूध पोळल्यामुळे यापुढे भगवानगड ताकसुद्धा फुंकून पिणार आहे.*
असो. शेवटी काही असलं तरी अध्यात्म आणि राजकारण स्वतंत्र बाबी आहेत. राजकारण हा भगवानगडाचा विषय नव्हता आणि यापुढेही नाहीच. आळंदी, पंढरपुरप्रमाणे भगवानगड हेही एक तीर्थक्षेत्र असल्यामुळे
* या रे या रे लहान थोर l
  याती भलती नारी नर ll
*🚩🚩जय भगवान🚩🚩*
*🚩🚩जय भगवान🚩🚩*
*🚩🚩जय भगवान🚩🚩*
🙏�🙏�🙏�

No comments:

Post a Comment

Bhagwan baba png 5